Posts

Showing posts from February, 2020

आर्थिक मानसशास्त्र

Image
मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या दोन्ही शाखा मानवाचा अभ्यास करतात. बाजारात वस्तूची निवड करणे, वस्तूची इतर वस्तूंशी तुलना करणे, वस्तू खरेदी करणे, तिचा उपयोग करणे ह्या सर्व गोष्टी वर्तनात समाविष्ट असतात. वस्तूची खरेदी जसे वर्तनाचा भाग आहे, तसेच वस्तूच्या उपभोगातून मिळणारा आनंद देखील वर्तनाचाच एक भाग आहे. माणसाची आर्थिक प्रगती त्याची विचार प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, समस्यांचे आकलन यासारख्या अनेक मानसिक प्रक्रियांवर अवलंबून असते. आर्थिक मानसशास्त्र हि आंतरविद्याशाखीय एक महत्वाची अभ्यास शाखा आहे. ज्यामध्ये, माणसाच्या आर्थिक वर्तणुकीचा त्याच्या मनाच्या अवस्थांवर, आर्थिक स्थितीवर, व्यक्तीच्या सामाजिक स्थानावर, वैयक्तिक वर्तन आणि मानसिक जीवनावर होणारा परिणाम व कारणांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जातो.    शासनाचे  आर्थिक धोरण यशस्वी होण्यासाठी मानसशास्त्रीय घटक अत्यंत महत्वाचे असतात. त्यात देशातील लोकांचा सरकारच्या आर्थिक धोरणांवर विश्वास आहे का? ग्राहक आशावादी आहेत कि निराशावादी आहेत? शासनाच्या आर्थिक धोरणांचा लोकांची बचत आणि कर्जावर काय परिणाम होतो? जाहिरातींचा व ब्रॅण्डेड वस्तूंचा

मानसशास्त्रातील नवीन विचारप्रवाह

मानसशास्त्रातील नवीन विचारप्रवाह  डॉ. नागोराव डोंगरे  विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग  एस.पी .डी .एम .महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे (महाराष्ट्र)  मानसशास्त्र, मानवी मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्र हा मानवी वर्तनाचे बहुविध पैलू अभ्यासणारा, दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा, माणसाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आणि जीवनात अधिकाधिक आनंद वाढविणारा एक  महत्वाचा  विषय आहे. माणसाच्या जगण्याचा अंतिम हेतू काय? असा प्रश्न जर कोणी विचारला, तर याचे उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. पण आनंद मिळविणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा अंतिम हेतू असलेला बघावयास मिळतो.       आपण बघत आहोत की, औधोगिक क्रांती, माहिती तंत्रज्ञान यांनी माणसाचं संपूर्ण जीवन व्यापून टाकलं आहे. अगदी छोट्या बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक हाती हल्ली स्मार्ट फोन दिसतो.  फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप  सारख्या समाज माध्यमांवर सगळ्यांना फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरत नाही. व्हाट्सअप ग्रुपवरची खडाजंगी चर्चा, वाक्ययुद्ध, आचकट-विचकट मॅसेज, खोटे मॅसेज यावरून लोकांमध्ये तुडुंब वैचारिक व